Akshargranth
Prakshobh by Dr. Prakash Jadhav
Prakshobh by Dr. Prakash Jadhav
Couldn't load pickup availability
Prakshobh by Dr. Prakash Jadhav
‘जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव’ या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा मानणाऱ्या या आत्मकथनात्मक कादंबरीत शिक्षण घेण्यासाठी आप्तस्वकीय आणि इतरांशी कराव्या लागलेल्या संघर्षाची गोष्ट सांगितलेली आहे.
जीवनातील अडचणींवर मात करून ‘तिमिराकडून तेजाकडे’ मार्गक्रमण कसे करावे याचा बोध आपल्याला या कादंबरीतून घेता येतो.
पाचवीला पूजलेली गरिबी, भोवतालची घोर नकारात्मकता, सामाजिक हिणवणूक, या भयाण वास्तवात अंगिकारलेली सकारात्मक जगण्याची उर्मी आणि झंझावाती संघर्षातून निर्माण झालेली ध्येयवेडी अभिलाषा या कादंबरीत दिसून येते.
‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना’ साद घालत ‘उजेडाचे वारस’ होण्याची आकांक्षा बाळगणारी ही आत्मकथनात्मक कादंबरी वंचितांना शिक्षणासाठी प्रेरित आणि उद्युक्त करणारी आहे.
Sakal Prakashan |
Share
