Akshargranth
Shivnetra Bahirji Naik Khand 5 By Prem Dhande शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ५ - प्रेम धांडे
Shivnetra Bahirji Naik Khand 5 By Prem Dhande शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ५ - प्रेम धांडे
Couldn't load pickup availability
🔥 शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ५ !! 🔥
📚 प्रिबुकिंग ऑफर सुरू!
✅ पुस्तकाची किंमत : ₹499/-
🎯 प्रिबुकिंग विशेष किंमत : ₹399/-
✍️ लेखकांच्या स्वाक्षरीसह विशेष कॉपी
🎁 आकर्षक की-चेन मोफत
📚 वितरण दिनांक : ३ जून २०२६ पासून सुरू.
आपण आजवर शिवाजी राजांची अग्र्यातून सुटका हि एक घटना वाचत आलो आहोत. त्या घटनेत राजे आग्र्याला गेले कसे हे आपल्याला ठाऊक आहे. पण आपले राजे क्रूर बादशहा औरंगजेबाच्या कैदेतून निसटले कसे आणि ते अतिशय गुप्तपणे प्रवास करत राजगडावर कसे पोहोचले? तसेच शिवाजी राजांना शंभू राजांच्या निधनाची बातमी पोहोचवण्याची कल्पना नेमकी कशी सुचली? आपले राजे तर बादशाहाच्या कैदेत होते पण तरीही ते आपल्या सुटकेचे नियोजन इतक्या अचूकपणे कसे आखू शकले?
कारण राजांचा हुकमी एक्का ‘बहिर्जी नाईक’ बाहेर होते. ते आग्र्यातच कायम राजांच्या जवळपास असायचे. राजांनी आणि बहिर्जीनी अतिशय चोखपणे आखलेली ती सुटकेची योजना नेमकी कशी साकार झाली?
तसेच शिवाजी राजे स्वराज्यात परतल्यावर त्यांनी पहिली स्वारी कुठे केली? आणि बहिर्जी नाईकांनी त्या स्वारीची योजना कशी आखली?
आणि त्याकाळात राजांच्या सगळ्यात गाजलेल्या मोहिमांपैकी एक मोहीम म्हणजे गोवा मोहीम. दोन महिन्यात सगळ्या हिंदुनी गोवा सोडून निघून जाण्याचा हुकुमनामा गोव्याच्या व्हाईसरॉयने काढला होता. त्याचे उत्तर म्हणून शिवाजी राजांनी गोव्यावर वादळी हल्ला केला. पण त्या हल्ल्याच्या आधी शिवरायांच्या गुप्तहेरांनी नेमकी काय आणि कशी कामगिरी बजावली?
या सगळ्यांची उत्तरं म्हणजे शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ५
Share
