Akshargranth
Shivrayanche Rantandav Pree Booking by Prem Dande
Shivrayanche Rantandav Pree Booking by Prem Dande
Couldn't load pickup availability
Afjalkhan Vadhanantarchi Gosht Mhanajech Shivarayanche Rantandav By Prem Dhande अफजलखान वधानंतरची गोष्ट म्हणजेच शिवरायांचे रणतांडव
नोव्हेंबर १६५९मध्ये एक वेळ अशी आली होती की, काळ जणू क्षणभर थांबला होता. तो काळ, या भूमीचा इतिहास आणि मराठ्यांच्या माना अभिमानाने उंचावणारा ठरला. पण हा अभिमान मराठ्यांना सहज मिळाला नव्हता. त्यासाठी त्यांच्या राजेश्री स्वामींचे प्राण पणाला लागले होते. सवर्दूर भयाण अंध:कार आणि त्यात पेटणारी इवलीशी ज्योत इतकेच त्यावेळी मराठ्यांचे अस्तित्व होते. पण त्या एका घटनेनंतर त्या ज्योतीचा वणवा झाला आणि सारे जग मराठ्यांच्या पराक्रमाला मुजरा करु लागले. मराठ्यांच्या राजेश्री स्वामींच्या पराक्रमाला...
अफजलखानाचा वध सगळ्यांना ठाऊक आहे; पण त्या दानवाच्या वधानंतर शिवरायांनी आदिलशाही मुलखात जे रक्तरंजित थैमान घातले, त्या थरारक थैमानाची ही कहाणी.
खानाला नृसिंहाप्रमाणे फाडून, यवनी सत्तेचा मुलुख ताब्यात घेत राजे फक्त अठरा दिवसांत पन्हाळ्यापर्यंत पोहोचले.
पण या अठरा दिवसांत काय काय घडले? शिवरायांच्या वादळी पराक्रमाची ही आजवरची सर्वात वेगवान आणि सविस्तर कहाणी!
Share
